UPSC Success Story of Gaurav Kaushal
कित्येकदा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना निराश होतो किंवा खचून जातो, पण तुम्हाला आज एक अशा व्यक्तीची यशोगाथा (UPSC Success Story of Gaurav Kaushal) पुढे वाचायला मिळणार आहे. जी वाचून तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळेल. तर ही गोष्ट आहे हरियाणाच्या पंचकुला शहरातील रहिवासी असलेला गौरव कौशल ची.
ज्यांनी कठोर परिश्रमाने मोठं यश संपादित केलं आहे. IIT मधून बाहेर पडून, BITS पिलानीला मागे टाकून आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ३८ वा क्रमांक मिळविला. आणि मोठे यश मिळवले आहे. UPSC Success Story of Gaurav Kaushal
अशाच अपडेट साठी आपला ग्रुप | Click Here |
Gaurav Kaushal Success Story In Marathi
तर चला आपण यांचा जीवन प्रवास थोडक्यात पाहूया. गौरव कौशल आयआयटी-जेईई परीक्षेत यश मिळवून, त्याने आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला, पण त्याला लवकरच कळले की अभियांत्रिकी त्याच्यासाठी योग्य नाही. त्यानंतर, गौरवने आयआयटी सोडले आणि बीआयटीएस पिलानीमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक सुरू केला.
पण त्यामध्ये देखील त्यांचे मन लागेना आणि हवा तो आनंद त्यांना होईना, म्हणून त्याने पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून आपली पदवी पूर्ण केली. गौरवने आपल्या प्रवासात अनेक निर्णय घेतले, जे निर्णय पुढे जाऊन त्यांच्या यशाचे कारण देखील ठरले.
गौरवचा स्वभाव असा होता की त्यांना नेहमीच आव्हाने स्वीकारायला आवडत होती, म्हणून त्याने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये, त्याने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय संरक्षण सेवा (IDES) मध्ये नोकरीला सुरुवात केली. गौरवचा हा निर्णय त्याच्या यशस्वी करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
गौरव ला नागरी सेवेत काम करत असताना देशभरातील लष्कराच्या जमिनींची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली गेली होती. त्यामध्ये त्यांनी तब्बल 12 वर्षे प्रामाणिकपणे काम केले, त्याला काहीतरी अपूर्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे सर्वांना आश्चर्यचकित करत, गौरवने आपली प्रतिष्ठित आयएएस नोकरी सोडली आणि नवीन आव्हानांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला.
ही स्टोरी पहा : Ratan Tata Biography in Marathi: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती किती आहे? पहा पूर्ण जीवन प्रवास
गौरव कौशलचे नवीन उद्दिष्ट आता पुढील पिढीतील यूपीएससी उमेदवारांना मार्गदर्शन करणे आहे. आज, तो यशस्वी मार्गदर्शन कार्यक्रम चालवतो आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देतो. त्याच्या YouTube चॅनेल आणि गौरव कौशल ॲपच्या माध्यमातून तो हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. Gaurav Kaushal Success Story
गौरव कौशलची कथा हे दाखवते की खरे यश समाजाच्या नियमांनुसार राहून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नाही, तर स्वतःची निवड आणि आनंद शोधण्यात आहे. त्याने सुरक्षित सरकारी नोकरी सोडली, कारण त्याला त्याच्या आवडीचा पाठपुरावा करायचा होता आणि त्याला त्याच्या निर्णयावर विश्वास होता.
तसंच मित्रांनो तुम्हालाही या स्पर्धा परीक्षेच्या युगामद्धे तुमच्या निर्णयावर विश्वास असायला हवा. आशा करतो की तुम्हाला नक्कीच या स्टोरी मधून थोडीसी तरी ऊर्जा मिळाली असेल. UPSC Success Story of Gaurav Kaushal ही स्टोरी तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा आणि आमच्या ग्रुप ला जॉइन व्हायला विसरू नका.
ही स्टोरी नक्की वाचा :